शाश्वत-अटळ, – उंबरठा

जन्म, त्या दाराचं पहिलं पाऊल जिथे आपण त्या अटळ सत्याच्या दिशेने पुढे सरकतो. हा जन्म त्या वाटेवरचा वाटसरू, जिथे अनेक स्वप्नांशी, परिस्थितीशी, भिन्न गोष्टींशी तो सोबत करून, हातात-हात घालून त्या दिशेने चालतो. हा जन्म चालता-चालता आपली शारीरिक अन मानसिक अवस्था बदलतो “वेळेप्रमाणे”.. जसं ते बालपण! त्या अटळ सत्याच्या दारापर्यंत त्याला सोबत करतं. ती अवस्था त्याला रांगत, पळत, पडत का होईना त्या दारापर्यंत घेऊन जातं..

शाश्वत-अटळ, – जन्म

बालपणात कसलाच स्वार्थ नसतो; असतो तो आनंद छोट्या-छोट्या गोष्टींत लपलेला. तो पाहिलेला चंद्र मनात घर करतो पण निस्वार्थ.! हे बालपण त्याला पकडण्यात कधीच मग्न नसतं, ते तर केवळ निर्मोह हसत राहतं त्या चंद्राला बघून.. हे बालपण बघतं त्या क्षितिजाकडे, त्या सूर्याकडे, ती किरणं अंगावर घेतं अन् डोळे मिचकावतं निःसंदेह.. त्याला नसते उद्याची फिकीर.. हे बालपण त्या घडणाऱ्या मनाची अवस्था असतं, अहंकारविरहीत आस्था असतं. हे बालपण पाऊल असतं त्या नव्या दिशेने, जिथे कुठल्या दिशेला जायचं हे माहिती नसतं पण……
आज पासून सुरु होतंय एक नवीन पाक्षिक सदर..
शाश्वत-अटळ
नक्की वाचा..
दर महिन्याच्या ६ आणि २१ तारखेला..