Lockdown Diaries- 1

तितक्यात कमी ऐकायला येणाऱ्या आमच्या घरातील सर्वात मोठ्या सदस्याने एक वक्तव्य दिलं.. आजोबा म्हणाले “या करूना चं काय.. काय करायचं आता.. करूना लयं आगाव दिसते.. म्हणे आजार रोग असलं काही तरी घेऊन येतेय.. देवा.. कसं होणार रे.. निसर्गाला होणाऱ्या माणसाच्या त्रासानेच त्याने मानवाला अद्दल घडवण्यासाठी सुचवलेलं दिसतंय..”

आजोबांच्या या वक्तव्यात फक्त नाव विचित्र होतं नाहीतर त्यांनी म्हटलेला शब्द अन् शब्द हा खराचं होता की..

झाले घड्याळात साडे आठ वाजले आणि मी घराबाहेर पडले..

गीत माझ्या मनातले- येणार साजण माझा

आज तो परत येणार होता..! ती खिडकीत बसली होती.. सगळा घटनाक्रम आठवून झाला होता. तिचे डोळे त्याच्या वाटेकडे लागलेले. या डोळ्यांमध्ये याआधी इतकी आतुरता कधीही आणि कोणासाठीही नव्हती. मागे रेडिओवरचं गाणं तिच्या मनातली अवस्था अगदी यथोचित शब्दात मांडत होतं..

वाट पाहते मी ग.. येणार साजण माझा..!!

मुसाफिर अभि- चिंता – काळजी

लॉकडाउन, मास्क-सॅनिटायझर, नियम-अटी, वर्क फ्रॉम होम या सगळ्या धाग्यांनी आपण आपल्याला बांधून ठेवलंय अक्षरशः अहो धागेच आहेत फक्त.. आयुष्य ह्याहून फार मोठं आहे.. या सगळ्यात मुळात आपण जगणंच सोडलंय असं नाही वाटत.. हां पण या काळात चिंता आणि काळजी मधला फरक मात्र मला चांगलाच उमगलाय..

हे दोन्ही शब्द जरी समानार्थी वाटत असले तरी काळजीशी, आपुलकीची सकारात्मकता जोडली आहे आणि चिंतेशी, भीतीची नकारात्मकता जोडली आहे.

आज पासून सुरु होतंय एक नवीन पाक्षिक सदर..
अभिषेक करंगुटकर याच्या लेखणीतून साकारलेलं मुसाफिर अभि शी केलेलं हितगुज..
मुसाफिर अभि नक्की वाचा.. दर महिन्याच्या १० आणि २४ तारखेला..

उलटा चष्मा- सुजय डहाके

शब्दीप्ता eMagazineचा संपादक डॉ. तुषार पवार याने घेतलेल्या मुलाखती.. ज्यांच्या चष्म्यातून आपण सिनेमा नाटक मालिका पाहतो.. त्यांना त्यांचाच चष्मा उलटा घालायला लावून त्यांच्या दिग्दर्शनाच्या शैलीबाबत.. आणि त्यांच्या कलाकृतींबाबत बोलतं करण्याचा केला गेलेला हा प्रयत्न..

 “उलटा चष्मा” नक्की वाचा.. दर महिन्याच्या ९ आणि २३ तारखेला..
वाचा संपूर्ण मुलाखत..

प्रिय, गण्या- देश माझा

प्रिय,
गण्या

सकाळची वेळ होती मस्त आईच्या हातचा चहा पिऊन मी वेशिकडे निघालो होतो..

वाटत असणाऱ्या घरात जेथे महादेव भय्या राहायचे सहज त्यांच्या घराकडे  वळलो.. त्यांच्या चिमुरडीची गाठ घ्यायला.. चींकी वयाने लहान आणि विचाराने मोठी गोड.. सुंदर, मनमिळाऊ, तिची ओढ गल्लीतील प्रत्येकाला होती.. घरात एक आई आज्जी आणि ती चिमुरडी राहायची.. महादेव भय्या तर सरहद्दीवर देश सांभाळत असायचे.. जम्मू काश्मीर मध्ये तर फोन ही लावायला यायचा नाही.. रेंज नसायची आणि तिथे टॉवर ही नव्हता जवळपास.. त्यामुळे त्यांचा हाल-हवाला ते चिठ्ठी मधून कळवत असत…………..

आज पासून सुरु होतंय एक नवीन पाक्षिक सदर.. गणेश मगर याच्या लेखणीतून साकारलेली.. गण्याला लिहिलेली पत्र..

 “प्रिय, गण्या” नक्की वाचा.. दर महिन्याच्या ८ आणि २२ तारखेला..

तू भेटशी नव्याने- Buns n coffee

बॅगमधून तिने आणलेलं Ravinder Singh चं ‘will you still love me ?’ काढलं, bookmark  बाजूला ठेवून ती वाचू लागली..

“Rajveer rang the bell & lavanya opened the door”

तेवढयात तिची ऑर्डर आली, तिने ती घेतली आणि पुन्हा वाचु लागली,

“Lavanya was very shocked, she didn’t expect rajveer will surprise her in this way”

एवढ्यात तिला पुस्तकामागुन “Hiii” असा आवाज आला.

तिने पुस्तक थोडंसं बाजुला केलं आणि पाहिलं, साधारण 22-23 वर्षाचा मुलगा sky blue t- shirt, black jeans, sports shoes घालुन तिच्या समोर बसला होता. त्याच्या उजव्या पायातली सुटलेली shoelace पाहून तिने मान मुरडली आणि पुन्हा वाचू लागली..

शाश्वत-अटळ, – जन्म

बालपणात कसलाच स्वार्थ नसतो; असतो तो आनंद छोट्या-छोट्या गोष्टींत लपलेला. तो पाहिलेला चंद्र मनात घर करतो पण निस्वार्थ.! हे बालपण त्याला पकडण्यात कधीच मग्न नसतं, ते तर केवळ निर्मोह हसत राहतं त्या चंद्राला बघून.. हे बालपण बघतं त्या क्षितिजाकडे, त्या सूर्याकडे, ती किरणं अंगावर घेतं अन् डोळे मिचकावतं निःसंदेह.. त्याला नसते उद्याची फिकीर.. हे बालपण त्या घडणाऱ्या मनाची अवस्था असतं, अहंकारविरहीत आस्था असतं. हे बालपण पाऊल असतं त्या नव्या दिशेने, जिथे कुठल्या दिशेला जायचं हे माहिती नसतं पण……
आज पासून सुरु होतंय एक नवीन पाक्षिक सदर..
शाश्वत-अटळ
नक्की वाचा..
दर महिन्याच्या ६ आणि २१ तारखेला..

ब्रह्मानंद- गुरु नाही नाशिवंत(उत्तरार्ध)

प्रपा म्हणजे पाणपोई. श्रीगुरु हे निरंतर प्रवाहित होणा-या भगवत् चैतन्याची पाणपोईच असतात. कोणीही यावे व त्या सिद्ध ज्ञानमय चैतन्याचे पान करून सुखी व्हावे, तिथे कसलाही धरबंध नाही, कोणतीही अडवणूक नाही. फक्त अनन्यता व शरणागती मात्र हवी, तरच ह्या चैतन्याचे अमृतपान भरभरून करता येते.
शिष्याच्या विषयी असलेला श्रीगुरूंचा निखळ प्रेमभाव सांगताना अभंगाच्या तिस-या चरणात पू. श्री. दादा म्हणतात,
गुरु प्राणांचाही प्राण ।
शिष्यालागी आत्मदान ॥३॥
आपल्या शरीरात दहा प्राण असतात. प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे पाच मुख्य प्राण तर……
आज पासून सुरु होतंय
श्री. रोहनजी उपळेकर यांच्या अखंड सद्गुरू निष्ठेतून आणि संतसाहित्याच्या प्रगाढ अभ्यासातून लेखणीबद्ध झालेलं एक नवीन पाक्षिक सदर..
ब्रम्हानंद
नक्की वाचा..
दर महिन्याच्या ५ आणि २० तारखेला..

ब्रह्मानंद- गुरु नाही नाशिवंत(पूर्वार्ध)

श्रीगुरुपौर्णिमा !
तुम्हां-आम्हां सद्गुरुभक्तांचा सर्वोच्च सण, अत्यंत आनंदाचा दिवस.
प्रत्येक गुरुभक्त आजच्या दिवसाची वर्षभर वाट पाहत असतो, असे म्हटले तर वावगे ठरू नये. खरोखरीच, श्रीगुरुपैर्णिमेचा दिवस अत्यंत आनंदाचा व समाधानाचाच असतो.
आजचा परमपावन दिवस आपण आपल्या श्रीसद्गुरूंच्या स्मरणात, त्यांच्या अनुसंधानातच व्यतीत करायचा असतो व आपण तसेच करतोही. तोच खरा आनंदाचा ठेवा असतो.
श्रीसद्गुरु हे तत्त्व आहे. श्रीभगवंतांची परमकरुणामयी अनुग्रहशक्ती म्हणजेच श्रीसद्गुरु. ज्या देहाच्या आश्रयाने हे सनातन तत्त्व आपल्यावर कृपाप्रसाद करते तो पुण्यदेहही आपल्यासाठी नित्यवंदनीय, नित्यपूजनीयच असतो….

आज पासून सुरु होतंय
श्री. रोहनजी उपळेकर यांच्या अखंड सद्गुरू निष्ठेतून आणि संतसाहित्याच्या प्रगाढ अभ्यासातून लेखणीबद्ध झालेलं एक नवीन पाक्षिक सदर..
ब्रम्हानंद
नक्की वाचा..
दर महिन्याच्या ५ आणि २० तारखेला..

क्षणामृत

विधात्याच्या हरएक कला कृती प्रसंगाकडे जनमानसापेक्षा भिन्न नजरेने बघता आले तर.. विपरीतेतही समरसता आली नाही, तरी अलिप्तपणे न्याहाळायला तरी नक्कीच शिकता येईल.. स्वतःतील बलस्थानं अव्वल ठरण्यासाठी पुरेशी असतात.. केवळ प्रत्येकाने ती जगायला हवीत..

हीच आहे जीवन संजीवनी..

आज पासून सुरु होतंय एक नवीन पाक्षिक सदर..
क्षणामृत
नक्की वाचा..
दर महिन्याच्या ४ आणि १९ तारखेला..