Lockdown diaries-2

“अरे देशपांडे मास्तरांनी काल लेक्चर घेतलं राव”, गण्या म्हणाला.. आमच्या gang च्या एका सदस्याने आपलं मत मांडायला चालू केलं.. “हो! ना इतका वेळ कोणी कसं बोलू शकतं..?”, सगळ्यात जास्त बडबड करणाऱ्या निशा मॅडम बोलल्या.. तितक्यात कॅंटीनच्या छोटूने मधेच बोलत विचारलं,…

Television, मालिकांचे पुनरागमन आणि मुसाफिर_अभि

नमस्कार, राम राम मंडळी… मनोरंजन म्हणजे मनुष्याच्या जीवनातला एक अविभाज्य घटक.. माणसांमधल्या नात्यांच्या, भावविश्वात घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी, एका मागोमग सलग, सतत पहायला इथेच मिळतात.. कधी भाऊजींच्या प्रेमळ हाकेनी वहिनींच्या चेहऱ्यावर हास्य येतं.. तर कधी ते बबड्याच्या आळशीपणा मुळे,…

प्रिय गण्या, जीवाची बाजी

मी गावात होतो. काय झालंय न काय नाही विचार करत मी घराकडे वळालो घरापुढं लावलेल्या गाडीकडं माझं ध्यान गेलं.. काल आणलेल्या गाडीचं सुख जणू गायपच झालं होतं बग आणि ती गाडी घेण्यासाठी दादांनी पैकं कुठून आणलं.. कसं आणलं याची चिंता व्हायला लागली.. मी पाणी पिलो कळत नकळत खिश्यात असलेला 12 हजाराचा मोबाईल काढून टाइम बघितला 1 वाजून 30 मिनिट झाली होती..

तू भेटशी नव्याने- चांदणे तुझ्या स्मरणाचे

नाना, आकाशातुन समुद्रात पडणाऱ्या थेंबांना किंमत नसते, किंमत फक्त शिंपल्यात पडणाऱ्या थेंबांना असते, कारण त्यांचा मोती होतो.. नाना तुम्ही मला किंमत दिलीए.. आणि मी वनवासातली सीता कधीच नव्हते कारण सीतेच्या पतीने तिला अग्नीपरीक्षा द्यायला लावली होती.. नाना तुम्ही माझ्यावर कधी साधं ओरडलाही नाहीत कधी.. मला सोन्यासारखी पोरं दिलीत.. समाजात मला किंमत मिळवून दिलीत.. तुमच्या कर्तुत्वामुळे समाजात नेहमी मी नानांची पत्नी म्हणून मिरवलं..

ब्रह्मानंद- मीराँ गिरधर प्रेम दिवाँणी

अनुत्तरभट्टारिका, व्रजनंदिनी महारासेश्वरी श्रीकृष्णप्रिया श्री श्री मीराबाईंच्या श्रीचरणीं जयंतीनिमित्त सर्वांच्या वतीने सादर साष्टांग दंडवत !
अभंग आस्वाद – भाग नववा मधील पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी रचलेल्या अतिशय गोड काव्यमय  अर्पणपत्रिकेच्या रूपाने आपणही महाभगवती श्री मीराबाईंच्या चरणीं प्रेमपसायाची सादर प्रार्थना करू या.

शाश्वत-अटळ, – उंबरठा

जन्म, त्या दाराचं पहिलं पाऊल जिथे आपण त्या अटळ सत्याच्या दिशेने पुढे सरकतो. हा जन्म त्या वाटेवरचा वाटसरू, जिथे अनेक स्वप्नांशी, परिस्थितीशी, भिन्न गोष्टींशी तो सोबत करून, हातात-हात घालून त्या दिशेने चालतो. हा जन्म चालता-चालता आपली शारीरिक अन मानसिक अवस्था बदलतो “वेळेप्रमाणे”.. जसं ते बालपण! त्या अटळ सत्याच्या दारापर्यंत त्याला सोबत करतं. ती अवस्था त्याला रांगत, पळत, पडत का होईना त्या दारापर्यंत घेऊन जातं..

चार पावसाळे अधिक- B+ve विचारगट

मला आयुष्य चांगल्या प्रकारे जगायचंय.. माझ्या गरजा मी माझ्या मिळकतीत पूर्ण करू शकत नाही.. म्हणून मी कर्ज घेतो ‘B+_विचारगट’ म्हणेल मी कर्ज स्वखुशीने घेतेले आहे.. माझ्या गरजांसाठी घेतले आहे.. मी ते फेडू शकतो इतक्याच प्रमाणात घेतले आहे.. ज्या कामासाठी घेतलंय ते; म्हणजे धंद्याला भांडवल, राहायला घर, मुलांचे उच्चशिक्षण, शेतीत सुधारणा, मुलीचे लग्न, आईवडिलांचे आजारपण या विधायक कामांसाठीच खर्च केले जाईल.. याउलट मी इतके कर्ज घेतले आहे आता ते कसे फेडू, याचं सुरुवातीलाच टेंशन घेणे.. घेतलेलं कर्ज दुसऱ्याच कुठल्या विघातक कार्यासाठी खर्च करणे.. मनमानी खर्च करणे.. त्या पैशांचा वापर उत्पन्न मिळवण्यात न केल्या कारणाने कर्ज फेडू शकत नाही.. आणि मग काय.. पुन्हा कर्ज.!!

क्षणामृत- जीवन संजीवनी

राधा आज फार समाधानाच्या हावभावांनी निजली होती.. अजिंक्यला उगाच आपण कुठेतरी चुकतोय असे वाटुन गेले.. सोळा वर्षांचा हा सुखी संसार रेटतांना राधेच्या या गुणांकडे मी का बघीतले नाही.. तीला मी मॅच्युअर्ड म्हणून गृहीत धरले अन् ती त्यात खरी उतरत गेली. आता त्याला आठवु लागलं. गेली कित्येक वर्षं आम्ही दोघांनी करिअर.. बँकबॅलन्स..

साधना विवेकाची

सतत सावधपणे विवेकबुद्धी जागृत ठेवल्यास आपल्याकडून योग्य, सत्य, कायमस्वरूपी टिकणारे असेच कर्म घडू शकेल. ज्यामुळे चुकांपासून बव्हंशी दूर राहता येईल. नकारात्मकता दूर ठेवून स्वतः ला अधिकाधिक उन्नत करता येईल.

विवेकी वृत्ती ही आयुष्य आनंदाने जगायला शिकवणारी आहे. ती प्रत्येक क्षणी आपल्या सोबत आहे. सातत्याने विवेकशील राहता आले तर स्वतः ला व इतरांना आनंदी ठेवणे शक्य आहे…