सुरेल वाटचाल- आनंदी जोशी

लहानपणापासून गाण्याच्याच वातावरणात वाढलेली.. वडिलांकडेच शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाचा श्रीगणेशा करणारी.. आणि non-filmy गाण्यांमुळे प्रयोगशीलता जिवंत राहते असं आवर्जून सांगणारी.. मराठी संगीतसृष्टीतली एक आघाडीची गायिका असणारी “आनंदी विजय जोशी..” आनंदी दाक्षिणात्य  संगीतसृष्टीत काम करण्याची इच्छाही तितक्याच प्रांजळपणे व्यक्त करते.. पाश्चात्य संगीतातल्या काही गोष्टींचा अंगीकार करून जर नवनवीन प्रयोग झाले तर संगीतसृष्टीला नव्याने पालवी फुटेल असं सांगत आपल्या नोबल असण्याची ग्वाही देते.. आनंदीची झेप गरुडालाही लाजवेल अशी आहे.. तिच्या साठी सारं आभाळंच खुलं आहे..
वाचा शब्दीप्ता च्या टीम ने घेतलेली तिची ही खास मुलाखत..

गगन ठेंगणे- रोहन उपळेकर भाग १

रोहनजींना , “ सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे संतसाहित्य अभ्यासक ” हा राज्यस्तरीय पुरस्कार पुणे येथील श्रीपाद सेवा मंडळातर्फे प्रदान करण्यात आला आहे. अध्यात्माची नाळ रंजल्या-गांजल्यांच्या सेवेशी जोडून आपण आणि आपल्या साधकबंधूंनी “श्रीहरिपाठ सेवा प्रतिष्ठान ” च्या माध्यमातून आषाढी वारीतील अक्षरशः लाखो वारकऱ्यांवर वैद्यकीय उपचार केले आहेत. वनस्पतिशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून, आता आपण श्रीपाद सेवा मंडळ या धर्मादाय न्यासाच्या सातारा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र दत्तधाम प्रकल्पावर राहून देवांची सेवा तसेच संत-साहित्याच्या अभ्यासाला वाहून घेतले आहे..

अभिनिवेष- अमृता देशमुख

पुढे career कला क्षेत्रातंच करायचं असं अगदी लहानपणापासून ठरवणारी.. अतिशय स्पर्धा असणाऱ्या क्षेत्रात; आपलं असं कुणीही नसताना पहिलाच प्रोजेक्ट श्रेयस तळपदेंच्या Affluence सारख्या आघाडीच्या production house बरोबर करायला मिळणं हे मी माझं भाग्य समजते असं आवर्जून सांगणारी.. आणि मराठी चित्रपटसृष्टीने मला तिच्यात लवकरात लवकर सामावून घ्यावं असं अगदी निरलसतेने म्हणणारी.. “तुमचं आमचं सेम असतं” म्हणत महाराष्ट्रातल्या घर-घरात पोहोचलेली एक गुणी अभिनेत्री ‘अमृता देशमुख’ व्यक्त होतीये खास शब्दीप्ता magazine च्या वाचकांसाठी..

कर्मयोगी- डॉ. बाबा आमटे

शिकार कशाची करायची हे निश्चित आहे.. निबिड जंगलात धावायचं आहे.. दिशा पण ठरलेली आहे.. शिकारीचं धैर्य आहे.. हातात गांडीव आहे.. पाठीवर भाता आहे.. इतकं सगळं असून भात्यात जर संवेदनशिलतेचे शर नसतील तर मग शिकार कशी करणार.. “संवेदनांचे शर हरवून बसलेल्या तरुणांनो, प्रत्यक्ष कृतीशिवाय तत्वांना.. विचारांना किंमत नसते.. आचरणाशिवाय वाणी पोकळ ठरते.. शरणागतीत कसलेही भविष्य नसते, भविष्याची आशा दडपलेली असते.. ती कृतीमध्ये..

शब्दीप्ता of the issue- कवी ग्रेस

डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांच्या महाश्वेता या कादंबरीवर आधारित असणाऱ्या मालिकेचं शीर्षक गीत लिहिणारे.. आपल्या “वाऱ्याने हलते पान” या पुस्तकासाठी २०११ सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलेले.. लेखक-कवी.. माणिकराव सीताराम गोडघाटे अर्थात “ग्रेस”..
Ingrid Bergman च्या “The Inn of the sixth happiness” या सिनेमातल्या तिच्या पात्रामुळे प्रेरित होवून त्यांनी स्वतःला ग्रेस म्हणवून घेत असल्याची कबुली एका मुलाखतीत दिली होती..