शब्दीप्ता of the issue- डॉ. सुमति क्षेत्रमाडे

स्वातंत्र्य पूर्वीच्या काळात ७ मार्च १९१३ या दिवशी सुमतिताईंचा जन्म झाला.. एका सर्वसामान्य कुटुंबात ज्या प्रमाणे एका मुलीला वाढवलं जातं त्याच प्रमाणे त्यांना वाढवलं गेलं.. त्यांच्या घरी कधीच मुलगा-मुलगी असा भेदभाव केला गेला नाही आणि त्यामुळेच कदाचित अतिशय चुणचुणीत अशी…

शब्दीप्ता of the issue- गुलजार साहेब

अतिशय प्रतिभासंपन्न लेखणी.. ‘पेना’ला असणारी ‘शीला’ची जोड.. आणि खर्जात लागणारा आवाज या स्वर्गानुभूतीच्या ईश्वरीय देणग्या लाभलेला एक कविमनाचा माणूस ज्याच्या अवकाशात.. रेहमान त्याच्या अवीट गोडीच्या चाली गुणगुणत असतो.. लता दीदी – आशा ताई एकमेकींना सवाल जबाब करत असतात.. कुठल्या तरी कर्मठ पीठाचे शंकराचार्य धर्माच्या गोष्टी करत असतात.. चर्चमधले फादर आणि मशिदीतले मौलाना एकत्र बसून बुद्धीबळ खेळत असतात.. आणि त्यांचा चिमुरडा नातू समय या सगळ्यांना बरोबर घेऊन नवा व्यापारचा डाव मांडून बसलेला असतो..

शब्दीप्ता of the issue- सुधा मूर्ती

अत्यंत भावस्पर्शी लेखन.. वाचकाच्या मनाचा अलगत ठाव घेणारी लेखनशैली.. आणि भाषेच्या बंधनापल्याड डोकाऊ पाहणारी वर्णनं.. या मुळे लक्षात राहतात त्या लेखिका सुधा मूर्ती; ‘डॉलर बहू’.. ‘महाश्वेता’.. यांसारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून भारतीय समाजचित्रण करणारं एक मनस्वी व्यक्तिमत्व.. infosys foundationच्या माध्यमातून Philanthropy करणाऱ्या सुधाताईंनी तर भारतीय स्त्री मधील कर्तुत्वसंपन्नतेची साऱ्या जगाला ओळख करून दिली..

शब्दीप्ता of the issue- मिलिंद बोकिल

अत्यंत भावस्पर्शी वर्णन.. लेखणीच्या सहाय्याने गुंतवून ठेवणारी शैली.. आणि तरल तरंगी लिखाण या मुळे लक्षात राहतात ते लेखक-कवि मिलिंद बोकील; गवत्या.. एकम्.. समुद्र.. शाळा.. यांसारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून मानवी मनाच्या गाभ्याला हात घालणारे एक प्रभावी व्यक्तिमत्व; शाळा या सिनेमाच्या प्रदर्शनातून तर त्यांचा साहित्यप्रवाह सर्वसामान्यांपर्यंत जाऊन पोहोचला.. आणि मिलिंद बोकील हे नाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले.. त्यांची शाळा ही कादंबरी वाचताना जाणवतं कि त्यांनी space realization च्या माध्यमातून ही कथा गुंफली आहे..

शब्दीप्ता of the issue- रत्नाकर मतकरी

रहस्यमयता आणि नाट्यमयता हे मतकरींच्या लेखन प्रतिभेचे पैलू आहेत.. मतकरींनी परीकथाही लिहिल्यात.. आणि भयकथाही.. दोन्हीमध्ये अकल्पित गोष्टी घडतात हे साम्य आहे.. परीकथांमधून त्या वर्णनाची गोड-गोड बाजू दिसते तर गूढकथांमधून अतिमानुष..

शब्दीप्ता of the issue- कवी ग्रेस

डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांच्या महाश्वेता या कादंबरीवर आधारित असणाऱ्या मालिकेचं शीर्षक गीत लिहिणारे.. आपल्या “वाऱ्याने हलते पान” या पुस्तकासाठी २०११ सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलेले.. लेखक-कवी.. माणिकराव सीताराम गोडघाटे अर्थात “ग्रेस”..
Ingrid Bergman च्या “The Inn of the sixth happiness” या सिनेमातल्या तिच्या पात्रामुळे प्रेरित होवून त्यांनी स्वतःला ग्रेस म्हणवून घेत असल्याची कबुली एका मुलाखतीत दिली होती..

शब्दीप्ता of the issue- श्री. प्रवीण दवणे

कितीही खस्ता खाल्या तरी त्यातून उभारी घेण्याचं बळ पंखांमध्ये फुंकून सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला गगन भरारी घेण्याचं स्वप्न पहायला लावणारे.. सामान्याहून सामान्य होत प्रसंगी घरातल्या कर्त्या पुरुषाची जागा घेत अस्तित्वाची लढाई लढण्याचं बळ देणारे.. प्रवीण दवणे.. आपल्या सहज, सोप्या अन् ओघवत्या शैलीतल्या लिखाणामुळे विशेष ठरतात..
ज्याच्या अंगातले त्राणच संपले आहेत अश्या व्यक्तीलाही मदतीचा हात देऊन.. कोणत्याही परिस्थितीतून बाहेर काढण्याचा मानस ठेवत.. ‘सावर रे..’ म्हणत.. श्री. दवणे आपल्यासमोर येतात..