अतिशय प्रतिभासंपन्न लेखणी.. ‘पेना’ला असणारी ‘शीला’ची जोड.. आणि खर्जात लागणारा आवाज या स्वर्गानुभूतीच्या ईश्वरीय देणग्या लाभलेला एक कविमनाचा माणूस ज्याच्या अवकाशात.. रेहमान त्याच्या अवीट गोडीच्या चाली गुणगुणत असतो.. लता दीदी – आशा ताई एकमेकींना सवाल जबाब करत असतात.. कुठल्या तरी कर्मठ पीठाचे शंकराचार्य धर्माच्या गोष्टी करत असतात.. चर्चमधले फादर आणि मशिदीतले मौलाना एकत्र बसून बुद्धीबळ खेळत असतात.. आणि त्यांचा चिमुरडा नातू समय या सगळ्यांना बरोबर घेऊन नवा व्यापारचा डाव मांडून बसलेला असतो..
